जयराम कराळे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह मनातील भाव तरंग आहे.
अवतीभवती च्या परिस्थितीतून जाणवलेले हे वैचारिक तरंग आहेत. एकूण ९२ कविता या संग्रहात आहेत.अनुभव गाठी असले व निरीक्षण सूक्ष्म असले की मनात तरंग उठतातच.
साध्या साध्या गोष्टीतून,प्रसंगामधून कवी मन टिपकागदासारखं भाव टिपत राहतं.
मानवी नाते संबंध जसे जाणवले तसेच ते त्यांनी आपल्या रचनेमधून उलगडले आहेत .
संवेदनशील मन असल्याशिवाय मनात तरंग उठत नाहीत. एखाद्या प्रसंगात
मन हरवून जातं, एखाद्या प्रसंगावर मनात असंख्य विचार येतात पण त्याला शब्दबद्ध करत असतांना मोजक्या शब्दात व्यक्त करता यायला हवं. प्रसंगानुरूप मानवी जीवनात अनेक भाव तरंग मनात उठत असतात आणि कालांतराने नष्टही होतात, पण काही प्रसंगामुळे उठलेले तरंग मनात एक भाव निर्माण करतात, जो कायमस्वरूपी मनात घर करतो.
माणसांच्या तरल भावभावनांचा वेध घेणं व त्यावर मोजक्या शब्दात भाष्य करून त्याचं काव्यात रूपांतर करणे ही एक कलाच आहे.
प्रसंग एक असला तरीही प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे भाव उमटत असतात आणि त्याला शब्दांच्या कोंदणात बसवणे प्रत्येकाला जमत नाही.
अनेक प्रसंगाकडे मुक प्रेक्षक म्हणून अनेक जण पाहतात. पण कवी मन
मोजक्या शब्दात भावना व्यक्त करतं.
जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात, घटनेत काव्य आहे त्याचा शोध घेता यायला हवा.
भावतरंग अंतरी
असे कवी म्हणतो.
भाव भावनांचे इंधन असल्याशिवाय तरंग उठत नाहीत.
साध्या साध्या गोष्टीतून कथानक फुलवणं हे जसं लेखकाचं काम असतं,
तसंच मानवी भावभावनांच्या साध्या साध्या भावनांची दखल घेणं कवीचं काम आहे.
प्रत्येक नात्याशी आपले काही देणे असते त्याबद्दलच्या भावना व्यक्त करत असताना त्या काव्यरूपात जयराम कराळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
नातेसंबंध उलगडताना मन कसं हळवं
होतं हे व्यक्त होताना प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त होते.
आई विषयी व्यक्त होताना
आई तुझे माझ्यावर
भावना व्यक्त व्हायला खूप काही अलंकार किंवा अवजड शब्द लागतात असे नाही.
पावसावरील कवितेत भाव व्यक्त करताना ते म्हणतात
रिमझिम पावसात
नाती उलगडत असताना अनेक विषयांना स्पर्ष या कवितेमधून होतो.
शब्दान्वय प्रकाशन तर्फे अनेक चांगली पुस्तके प्रकाशित होत आहेत त्यापैकीच एक भावतरंग आहे.
डॉ.सूषमा डाबेराव यांचे मुखपृष्ठ भावतरंग या नावाची समर्पक आहे.