काही व्यक्तींचे जीवन पाहिलं की ‘आमुचा प्याला दुःखाचा डोळे मिटून प्यायाचा’ हे आठवतं.कपड्याला जसं अस्तर असतं तसेच सुखालाही दुःखाचं अस्तर असतं.यश, पैसा,प्रसिद्धी यांना सुद्धा दुःखं हे न मागता मिळतं. जिथे समाधान आहे तिथे दुःखं फिरकत नाही. काहीतरी आयुष्यात मिळविण्यासाठी अनेकांची दमछाक होते. हवं ते मिळालं तरीही हव्यासापोटी माणसें शर्यतीत पळाल्याप्रमाणे पळत राहतात, आणि रस्त्यामधील विश्रांतीचे थांबे जे समाधान देतात तिथे थांबायलाही त्यांना वेळ नसतो. नुसताच संघर्ष करून मिळालेला हर्ष उपभोगायचा असतो, तो दुःखांपासून दूर ठेवतो याचा विसर अनेकांना पडतो.
प्रत्येकाची एक कहाणी असते कोणाची दुःखाची, कोणाची यशाची, सुखाची, कर्तुत्वाची प्रेरणेची,कोणाची एकटेपणाची, कोणाची अपयशाची.
अशीच एक मीनाकुमारीची हळवी कहाणी मनाला चटका लावून जाणारी कहाणी आपल्याला अस्वस्थ करते.
मीनाकुमारी ही एक हळवी, व्यथित पण अफाट प्रतिभेची अभिनेत्री होती. मीनाकुमारी ला "ट्रॅजेडी क्वीन" असं म्हटलं जातं, कारण तिचं संपूर्ण आयुष्यच वेदनेची कविता होती.
मीनाकुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो होतं. त्या खूप गरिब कुटुंबातून होत्या, त्यामुळे केवळ ४ वर्षांची असताना त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम सुरू केलं.
१९५२ मध्ये आलेल्या बैजू बावरा या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. पाकीझा, साहिब बीबी और गुलाम, काजल, परिणीता यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दुःख आणि भावनांची जी सखोल मांडणी केली, ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
मीनाकुमारी यांचा विवाह प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याशी झाला. हे नातं सुरुवातीला प्रेमळ होतं, पण नंतर त्यात खूप तणाव आणि दुरावा आला. त्यांना अनेक बंधनांत ठेवण्यात आलं, ज्यामुळे त्या अधिकच एकट्या पडल्या.
नात्यांचा प्रवास म्हणजे नागमोडी रस्त्यावरून चालण्यासारखं असतं. नात टीकणं म्हणजे हे वळण यशस्वीरित्या पार करणे असतं. अनेक कसोट्या पार केल्यानंतर नाती टिकतात. गैरसमजाचे स्पीड ब्रेकर्स यशस्वीरित्या पार पाडावे लागतात तेव्हा कुठे नाती टिकतात. एकमेकांना समजून घेणं म्हणजे डोहाचा तळ शोधणं असतं. डोहाचा तळ आणि माणसाचं मन कधीच हाती लागत नाही.
तणाव वेदना या शेवाळ्या सारख्या अनावश्यक वाढत जातात.तणाव आणि वेदना झाकण्यासाठी मिनाकुमारीने मद्यपान सुरू केलं. हे व्यसन त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत गेलं. पाकीझा चित्रपटाची शूटिंगही त्याच कारणामुळे अनेक वर्ष थांबली होती.
फिर आग बिरहा की मत लगाना, के जल के मै राख हो चुकी हूं...
अशीच भावना विरह सहन करणाऱ्या अनेक प्रेमिकांची असतें.
छुपालों यु प्यार दिल मे मेरा, के जैसे मंदिर मे लौ दिये की...
आपल्या प्रेमाचं जाहीर प्रदर्शन कुणालाच आवडत नाही ते समोरच्या व्यक्तीने त्याच्या हृदयात लपवून ठेवावं जशी मंदिरात ज्योत अखंड तेवत असतें अशीच भावना प्रेमीकांची असतें.
पाकीझा प्रदर्शित झाला आणि यशस्वीही झाला, पण काही आठवड्यांतच मीनाकुमारी यांचे निधन झाले – ३९ व्या वर्षी, ३१ मार्च १९७२ रोजी. हे यश पाहूनही त्याचा आनंद लुटता न आल्याने त्यांच्या आयुष्याचं दु:ख अधिक तीव्र वाटतं. बऱ्याच वेळेला यश येतं आणि आनंद जातो. आज फिर जीने की तमन्ना है वाटत असतानाच आज फिर मरने का इरादा है याचीही आठवण हृदय पिळवटून टाकणारी असते.चलो दिलदार चलो चांद के उस पार चलों याचे तरंग मनात उमटत असतानाच लो आ गयी उनकी याद वो नही आये यावर गप्प बसावं लागतं.
जणू मीनाकुमारी आजही साद घालतात...
"मी एक क्षण आहे, गेलेला, पण तुझ्या डोळ्यांत अजून जिवंत आहे."
मीनाकुमारी केवळ एक अभिनेत्री नव्हत्या, तर त्या एक संवेदनशील कवयित्रीही होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यातील वेदना, तुटलेपणा आणि तळमळ आपल्या कवितांमधून व्यक्त केल्या. त्यांच्या काही उल्लेखनीय कविता आणि डायरीतील ओळी पुढीलप्रमाणे.
"तुकडे तुकडे दिन बीता, धज्जी धज्जी रात मिली
जिसका जितना दामन था, उतनी ही सौगात मिली
जब चाहा दिल को समझाना, हँसने की आवाज़ मिली
जैसे कोई कहता हो – लो फिर तुमको मात मिली..."
ही कविता त्यांच्या आयुष्यातील तुटलेल्या क्षणांची आणि अंतर्मनातील संघर्षांची साक्ष देते. आपला आयुष्य म्हणजे तरी काय दुःखद क्षणांची व सुखद क्षणांची माळ असते.
तुटलेले क्षण, अपमानाचे क्षण, दुःखाचे क्षण लपवणाकडेच मानवी प्रवृत्ती असतें. मीनाकुमारींची डाव्या हाताची करंगळी अपघातात तूटली होती, अभिनय करताना त्या दक्षता घ्यायच्या कि ती दिसू नये.
"आग़ाज़ तो होता है अंजाम नहीं होता
जब मेरी कहानी में वो नाम नहीं होता..."
या ओळींमध्ये त्यांनी अपूर्ण प्रेमकथेचे दुःख व्यक्त केले आहे.
प्रेम हे केवळ शारीरिक नसून मनाचेही असते. मनाचे मनाशी असंख्य पातळीवर प्रेम असते. एकाच वेळी निसर्गावर प्रेम असते, अनेक व्यक्ती ज्या प्रेरणा आपल्याला देतात त्यांच्यावरही आपण मनापासून प्रेम करतो पण बऱ्याच वेळेला आपण अव्यक्त राहतो. अव्यक्त राहिल्यामुळे अनेक कथा अपूर्ण राहतात.
"चाँद तन्हा है आसमाँ तन्हा
दिल मिला है कहाँ-कहाँ तन्हा
बुझ गई आस, छुप गया तारा
थम गया है जहाँ-वहाँ तन्हा..."
ही कविता त्यांच्या एकटेपणाची आणि अंतर्मनातील रिकामपणाची अनुभूती देते.
माणसे खरं तर एकटीच असतात पाण्यावर तरंग उठावे त्याप्रमाणे काही जण आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.
"सियाह नक़ाब में उसका संदली चेहरा
जैसे रात की तारीकी में
किसी ख़ानक़ाह का
खुला और रौशन तक़
जहाँ मोमबत्तियाँ जल रही हों ख़ामोश
बेज़बान मोमबत्तियाँ..."
ही कविता त्यांच्या चित्रपट 'पाक़ीज़ा'शी संबंधित आहे आणि त्यातील सौंदर्याची आणि गूढतेची झलक देते.
मेणबत्ती जसे न बोलता प्रकाश देते स्वतः जळत राहते तसंच माणसांचं आहे. अनेक दुःखं न सांगता इतरांच्या चेहऱ्यावर हसू पसरवणे हेच आयुष्याचं जणू इतीकर्तव्य.
"मौत क्या दुल्हनों की सूरत है
ना कोई आरज़ू, ना कोई हसरत
कैसी प्यारी है मौत की मूरत…"
मृत्यू सुद्धा एखाद्या विवाहित तरुणी च्या चेहऱ्याप्रमाणे असतो ना कोणती इच्छा न कोणती आंस जणू फक्त प्रेमाळ चेहऱ्याने संसारात वावरणं.
या ओळींमध्ये त्यांनी मृत्यूच्या सौंदर्याची आणि त्यातील शांतीची कल्पना मांडली आहे. त्यांच्या कवितांचा संग्रह "तन्हा चाँद" (Lonely Moon) या नावाने प्रसिद्ध आहे, ज्याचे संकलन गुलजार यांनी केले आहे. हा संग्रह त्यांच्या आयुष्यातील वेदनांचा आणि अंतर्मनातील भावनांचा आरसा आहे. चेहरा जेव्हा आरशाला भेटतो तेव्हा आपल्याला फक्त चेहरा दिसतो पण आरशाला आपली वेदना दिसते.
मीनाकुमारी यांच्या कवितांमध्ये वापरलेली भाषा उर्दू आहे, जी मराठी वाचकांसाठी थोडीशी आव्हानात्मक असू शकते. परंतु त्यांच्या कवितांतील भावना आणि अभिव्यक्ती सर्व भाषांतील वाचकांना स्पर्शून जातात.
मृत्यू हा चटका लावणाराच असतो. आपल्या आयुष्यातील शेवटचं प्रकरण म्हणजे मृत्यू.अनेकांचं दुःखाने भरलेलं अनेकांनी त्याला आनंदाने स्वीकारून जगलेलं.
शारीरिक वेदनेला गोळी आहे पण मनात ठसठसणाऱ्या वेदनेला गोळी नाही, पण अनेकांनी बंदूकीची गोळी घालून त्या वेदनेला संपवलं आहे.
“Our sweetest songs are those that tells us saddest thoughts” असं उगीच नाही म्हटलेलं.