Image by Raviraj bhor from Pixabay

दररोज राब राब राबतो तो शेतकरी
खरच हा माणूस आहे किती कष्टकरी.

ऊन असो की पाऊस करत असतो शेतात मजुरी
कोणीही करू शकत नाही त्यांच्या मेहनतीची बरोबरी.

साधे जीवन - साधे राहणे, पण शेती करण्यात असते हुशारी
खरं तर शेतकरी आहे पहला सन्मानाचा मानकरी.

जेवणात असते साधी चटणी आणि भाकरी
अतिवृष्टी किंवा अनावृष्टि झाली की निराशा पडते पदरी.

शेतकऱ्यांचे कितीदा अनादर करतात कृषि व्यापारी
किमान आधारभूत किंमत नाही मिळाली तर होतात कर्जबाजारी.

कर्जा मुळे नेहमी असते त्यांचावर उधारी
कर्ज नाही फेडल्यावर आदेश येतो सरकारी.

वसूलीसाठी मग येतात बँकचे अधिकारी
नैराश्यामुळे आयुष संपवयाची असते सुद्धा मनाची तयारी.

विचार करा शेतकरी नसेल तर कसे पिकणार गहू, मका आणि बाजरी
यांच पिकवलेले धान्याचे पकवान करून सगळे खातात घरोघरी.

भविष्यात शेतकऱ्यांच्या कमतरतेमुळे अन्नासाठी सगळे होऊ शकतात भिकारी
जास्त मोल भाव करून, नका करू त्यांच्या मेहनतीची मस्करी.

चला पेटवू या मनात अशी चिंगारी
आणि सगळे बनूया शेतकऱ्यांचे सहकारी.

.    .    .

Discus